पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल या भीतीने अद्यापही राज्यातील मंदिरे कुलुपबंद आहे. कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला ठाकरे सरकार घाबरते आहे का ? कोरोना काय फक्त देवळातच आहे ? असा खडा सवाल उपस्थित करत शासनाने जर आता मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही तर मनसे राज ठाकरेंच्या आदेशानुसार मंदिरं उघडेल, असा गर्भित इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सरकारला दिला आहे.
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिर बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडत तिथे अभिषेक व होम करत आंदोलन केले. तसेच देवबाप्पा, राज्य सरकारला धार्मिक स्थळे सुरु करण्याची सुबुद्धी देवो असे म्हणत नागरिकांना कोरोनामधून लवकरात लवकर मुक्त कर व त्यामुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर असे साकडे देखील मनसेतर्फे घालण्यात आहे.
मनसेचे अजय शिंदे म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी समजणारी व त्याच्याच नावावर मते मागणारी शिवसेना सत्तेत आहे. मात्र सेनेचा मुख्यमंत्री असताना देखील राज्यातील मंदिरे बंद आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे. यावरूनच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परंतु, एकीकडे सरकार महसुलासाठी मद्यालये उघडते तर दुसरीकडे कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला घाबरते आहे. कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला.
सरकारला दिला आहे.
Read Also :
कोरोनामुळे यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नका : रामदास आठवलेhttps://t.co/wwZ4jzA1dF @RamdasAthawale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020