औरंगाबाद : अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर अत्याचार केला. तेव्हा एकनाथ महाराजांनी दार उघड बये दार उघड अशी हाक दिली आणि 1630 ला दार उघडलं आणि छत्रपतींचा जन्म झाला. नरहरी कुरुंदर यांच्या पुस्तकात त्यांचं छान वर्णन केलं आहे. महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेब इथं आला आणि तो पुन्हा तो कधी गेलाच नाही. औरंगाजेबाने पाठवलेल्या पत्रात शिवाजी अजून मला छळतोय असा उल्लेख केला असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
प्रत्येक गोष्ट जातीतून बघायची ही राष्ट्रवादी काॅंग्रेसची पद्धत आहे. त्यांच्या एकही सभेत छत्रपती शिवाजी महारांजाचा उल्लेख आला नाही. आता मी बोलायला लागल्यावर खोटे व्हिडीओ काढालायला लागले आहेत. मी नास्तिक बोललेलं पवारांना झोंबलं अन् मग देवाची पुजा करतानाचे फोटो त्यांनी काढले. माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून सभा घेतली असती तरी तुम्ही दुरदर्शनवरून पाहिलीच असती. गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील सभा घेतली त्यावर सध्या किती बोलत आहेत. संभाजीनगरचं मुळ नाव खडकी आहे. महाराष्ट्र दिन आज साजरा करताना आपण आज महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. जो इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल निसटतो असा हल्लाबोल आज औरंगाबाद मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांची सभा सुरू असताना सभेत गर्दीतून काही लोकांनी मागून खर्च्या फेकल्या. त्यावेळी ते भरसभेत म्हणाले की, जर कुणी टाळकी गडबड करायला आली असेल तर त्यांना तिथल्या तिथे हाणा. ही महाराष्ट्र नवनिर्माण सभेची सभा आहे. काही वेडवाकड कराला तर चौरंग करून पाठवले असा ही असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. त्यानंतर उपस्थित लोकांनी मोठा जल्लोष केला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पुढील भाषण सुरू केलं, तसेच या पुढच्या सभा संपुर्ण महाराष्ट्रात होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील यापुढे सभा होतील, असंही ते म्हणाले.