मुंबई – कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू झाली. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. “मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला.
काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली?” असे सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारले आहेत. “या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखं पॅकेज द्या” अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.
“कोरोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त कोरोना, असं आहे” असा टोला देशपांडेंनी लगावला. “या लॉकडाऊनच्या काळात कोणी नाईट लाईफ एन्जॉय केली, हे सर्वांना माहीत आहे, समजने वाले को इशारा काफी है, नाव घ्यायची गरज नाही” असा इशारा त्यांनी दिला. “व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला.
तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!! pic.twitter.com/nP0ZzzzphW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 23, 2020