यवतमाळ : शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना अळ्यांनी युक्त चॉकलेट वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींना दिलेल्या चॉकलेटमध्ये हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली.
पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात चॉकलेट वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला खुश करण्यासाठीचा हा खरा तर प्रयत्न. तरीही तत्परता हरविली. शाळांना सुट्टा लागल्यानंतर हे चॉकलेट पाठविले. इतक्या उशिरा पाठविले तर किमान त्याची गुणवत्ता तपासावी. असेही विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.
दरम्यान, पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला. त्यांनी चॉकलेटचे वाटप थांबवून प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. पालकांना न दाखविता लहान मुलांनी हे चॉकलेट खाल्ले असल्यास काय? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हे सरकार खेळत आहे. निष्पाप जिवांना वाटल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्येही हे सरकार आपला वाटा शोधत आहे. हीच आहे मोदींची गॅरंटी! असा खोचक सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..मतदान सुरू असतानाच कोल्हेंसोबत छत्रपतींचा फोटो, शरद पवार गटाच्या नेत्याची पोस्ट वादात
हेही वाचा…मोठी बातमी….! मावळात मतदानाच्या दिवशीच संजोग वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा तक्रार
हेही वाचा…मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारासह पक्षाच्या चिन्हाचा बोर्ड, पुण्यात भाजपचा ठिय्या आंदोलन
हेही वाचा…पुण्याचा पैसेवाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मोहोळांनी दिले सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले….