मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रबळ होत असून आज भारत भविष्यवादी दृष्टीकोन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून वाटचाल करत आहे. भारत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अभुतपुर्व गुंतवणुक करत असून आधुनिक कनेक्टिव्हिटी उभारण्यावर भर दिला जात आहे. येत्या 25 वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरं देशाच्या विकासात महत्वपुर्ण योगदान देणार आहेत. राज्यात दुहेरी इंजिन सरकार येतात रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीकेसीवर केलं.
ते पुढे बोलताना म्हणाले की, भारत आज एका नवीन कालखंडात प्रवेश करत आहे. नाहीतर गेल्या शतकातला एक मोठा कालखंड फक्त गरिबीची चर्चा करण्यातच गेला. फक्त इकडून तिकडून मदत मागून गुजराण करण्यातच गेला. आज भारताबद्दल जगात सकारात्मकता आहे. कारण आपण पुरेपुर सामर्थ्याने काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रबळ होत असून आज भारत भविष्यवादी दृष्टीकोन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून वाटचाल करत आहे. असंही ते म्हणाले.
रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. यात मुंबई लोकल आणि अन्य रेल्वे पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे. मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका खुप मोठी आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BMC चा बिगुल फुंकला. तसेच मुंबईचा कायापालट करण्याची सुरवात झाली आहे. देशातल्या प्रत्येक शहारामध्ये मल्टिमो़डल कनेक्टिव्हिटी उभारणार अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईला नवं सामथ्य देत आहेत. असंही ते म्हणाले.