मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी एक संयुक्त पत्रक जारी केले असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
पूर्व राष्ट्रपति श्री प्रणब मुखर्जी को पू. सरसंघचालक और मा. सरकार्यवाह जी की श्रद्धांजलि : pic.twitter.com/VHoEwo7iKe
— RSS (@RSSorg) August 31, 2020
या पत्रकात म्हटले आहे की, ते संघासाठी मार्गदर्शक होते. संघटनेबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनामुळे संघाचे कधीही न भरुन निघाणारे नुकसान झाले आहे.
दरम्यान, 2018 साली प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावरून वाद देखील झाले होते. प्रणव मुखर्जींची ही भेट त्यावेळी चांगलीच गाजली होती.