सातारा : महाराष्ट्र आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान सरकारनं मराठा बांधवांची परीक्षा पाहून नये मराठा समाजाच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा असं आवाहन ठाकरे सरकारला केलं आहे.तसेच मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं देखील सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करून हे आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली. तरीही सरकारने 11 ऑक्टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला MPSC परीक्षा घेण्याची एवढी घाई का?
जर सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने MPSC च्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.’
पुढे उदयनराजे म्हणतात, ‘ येत्या 11 तारखेला MPSC ची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15000 जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का ? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठा संताप निर्माण झाला आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे.’
सरकारने आता मराठा समाजाची परिक्षा पाहू नये…
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरलाच परिक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. https://t.co/njMrpyAs75 pic.twitter.com/HiU3LYqoT6— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 9, 2020
‘जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये. जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. तसेच विद्यार्थ्यांची अशा परिक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानाच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळे कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घोषित करावा.’
‘याशिवाय कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसेच परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परिक्षा कशासाठी घेत आहे? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार राहणार? त्यामुळे सरकारने या परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील.’
MPSC परीक्षा आणि मराठा आरक्षण यावरून उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा समाजाची परीक्षा पाहू नका, मराठा बांधवांचा उद्रेक झाला तर त्याला केवळ सरकार जबाबदार असेल असं थेट खासदार उदयनराजेंनी इशारा दिला आहे.
Read Also
शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीन चिट…सत्ता टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप https://t.co/kIIFp7xl6G#AjitPawar #NCP #ShikharBankGhotala #BJP #AtulBhatkhalkar @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020