काल काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. मात्र काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षात मोठा बदल करण्याची मागणी करत लिहिलेल्या पत्रावरून वाद उफाळून आला. राहुल गांधींनी देखील या पत्राच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत आताच हे पत्र का लिहिले असा प्रश्न उपस्थित केला.
या पत्रावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद पाहण्यास मिळाला. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये राज्यातील मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा या काँग्रेस नेत्यांचा देखील समावेश होता. आता या प्रकारावर काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुकुल वासनिक म्हणाले की, कोणालाही दुखावण्याचा माझा हेत नव्हता. माझ्याकडून हे अनवाधानाने घडले. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर बोलणे टाळले.
दरम्यान, सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदावर कायम राहणार असून, पुढील 6 महिन्यात नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल.