नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शहरातील दुकानदारांनी 18 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करावी, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाला संदीप जोशी यांनी विरोध केला आहे
प्रत्येक दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करावी, असा प्रशासनाने घेतलेला निर्णय अयोग्य आणि प्रॅक्टिकल नाही”, अशी टीका महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.
“कोरोना चाचणी न केल्यास दुकान बंद करण्यात येतील, हा महापालिकेचा तुघलकी निर्णय आहे. या निर्णयाबाबत अनेक व्यापारी संघटनांनी तक्रार केली आहे. नागपूर शहरात दररोज 5 हजार पेक्षा जास्त कोरोना टेस्ट होतात”, असं संदीप जोशी म्हणाले
“एकीकडे आधीच सम-विषम पद्धतीने दुकान उघडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. त्यात आता अशाप्रकारचा निर्णय घेणं चुकीचं आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा. ज्यांना टेस्ट करायची आहे ते स्वत: करतील”, अशी मागणी संदीप जोशी यांनी केली आहे.