गोंदिया : कृषी कायद्याच्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास 15 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकदा सरकारशी चर्चा करून देखील अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. यातच आता केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा स्वतः आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले म्हणाले की, मी संविधानिक खुर्चीवर जरी बसलो असलो तरी तरी मी शेतकरी आहे. 17 डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा त्यांनी दिला.
देश मे किसान आंदोलन सुरू है वह सही है!
देश के अन्नदाता की लड़ाई है!
प्रधानमंत्री सन्मानिय श्री नरेंद्र मोदी जी आपसे नम्र निवेदन करता हु की आपके द्वारा लाए गए किसान के लिये काले कानून को वापस ले!
मै किसान होने के नाते सांविधानिक पर होने के बावजूद मै किसान के लढाई मे शामिल होऊंगा! pic.twitter.com/x7NHWKzZgS— Nana Patole (@NANA_PATOLE) December 9, 2020
2017 साली देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पटोलेंनी राजीनामा दिला होता. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल त्याविरोधी आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणे माझे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. सरकारने पुन्हा एकदा चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.