मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून राजीनामा राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न रखडला होता. स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दाखवल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. पण आता नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाना पाटोलेंनी राजीनामा दिल्याने पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रसेचाच असणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याबाबत चर्चांना उधाण आले असतानाच. हि भेट कॉग्रेस अध्यक्षपदाच्या पदाबाबत असल्याचं आता स्पष्ट झाले आहे.
Read Also
“सुधीर मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे”
हिदुत्व सांगण्यातून नाही तर वागण्यातून दिसले पाहिजे -प्रवीण दरेकर