मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर त्याची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना हवे आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देखील सोपविण्यात आला. राज्यात देखील यावरून भाजप आणि सत्ताधारी पक्षांमध्ये राजकारण चांगलचे तापले. आता बिहार निवडणुकीसाठी या मुद्याचे भांडवल केले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
पुढील काही महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सुशांतच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर केला जाऊ शकतो. यावरून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला असून, मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#Justice4SSR साठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा. pic.twitter.com/rEFxwg4Gjb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 6, 2020
रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत ट्विट केले की, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवलं केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा. सोबतच त्यांनी भाजपाकडून छापण्यात आलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या स्टिकरचे फोटो शेअर केले आहेत.