मुंबई : काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहेत, पण सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. भाजपच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणता, मग पंतप्रधान कुठे आहेत ? ते देखील ऑफिसमध्ये बसूनच काम करत आहेत ना ?, असे प्रतिप्रश्न विचारत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसाठी बॅटिंग केली आहे
सोबतच रोहित पवार म्हणाले की, जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून सरकारवर होणाऱ्या टीकेबाबत उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत, असं ते बोलतायत, मग आम्हीही म्हणतो की, राज्य जेव्हा अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसं काय लक्ष घालू शकतात?’