उत्तर प्रदेश : हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर देशभरातून टीका होताना दिसत आहे. यावर राष्ट्रीवादी काँग्रेसनेही निषेध नोंदवला आहे.
“महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची…रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली: आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की आणि अटक याचा निषेध केला आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते @RahulGandhi यांना @Uppolice यांनी दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. प्रभू श्रीरामाचे नाव मुखी ठेवून कृती नथुरामाची करायची ही भाजपची वृत्ती पुन्हा समोर आली आहे. दडपशाही करणाऱ्या भाजपने वेळीच आपली धोरणे बदलावी. @INCIndia pic.twitter.com/HCwgVDcNxm
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 1, 2020
दरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
Read Also :
राहुल गांधींना धक्काबुक्की ! पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य ? सुप्रिया सुळे यांचा योगी सरकारला सवालhttps://t.co/xkORsZLiDC#RahulGandhi #SupriyaSule #YogiAdityanath #Ncp #Congress @RahulGandhi @supriya_sule @myogiadityanath
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020