ठाणे : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावरून अनेक नेत्यांनी हि बंदी उठवण्याची मागणी करत सरकारवर निशाण साधला आहे. त्याव्पार्शवभूमीवर ठाणे महिला काँग्रेसच्या वतीने या निर्यातबंदी विरोधात आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून त्यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ नये यासाठी हे बंदी त्वरित रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .
केंद्रातील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून त्यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ नये यासाठी हे बंदी त्वरित रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .
कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी केलेल्या आंदोलनात घोषणात मात्र कांद्याची निर्यात बंद करा अशी घोषणा स्वतः ठाणे शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलन नक्की कशासाठी आहे याची काहिच कल्पना कार्यकर्त्यांना नसल्याचे सत्य उघड झाले. बराच वेळ चाललेल्या या घोषणाबाजीत गडबड असल्याची बाब, प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यावर यात दुरुस्ती करण्यात आली.