पुणे : केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीला विरोध वाढत चालला आहे. देशासह महाराष्ट्रातील शेतकरी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून याचा विरोध केला. पुण्यात ग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर येत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने निषेध व्यक्त करीत पुण्यातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पंतप्रधानांना पोस्टाने कांदा पाठविला.
सन्माननीय मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट पाठवित आहोत. शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.(3/3)
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 18, 2020
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे कांदा पाठवत आपला निषेध व्यक्त केला.
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे, जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? तसेच देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान वल्गना करतात, त्याचवेळी ते शेतकरी विरोधात निर्णय घेतात, मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.