पुणे : उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल भाजपचे प्रतिनिधी रंजीत श्रीवास्तव यांचे वक्तव्य गुन्हेगारांना संरक्षण देणारे आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच उ.प्र उच्च न्यायालय यांनी श्रीवास्तव यांच्या विधानावरती कुठेतरी प्रतिबंध ठेवावी आणी त्यांना या संदर्भात समज द्यावी अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
रणजित श्रीवास्तव हे उत्तरप्रदेशमधील भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी मुलींबाबत अतिशय निर्लज्ज स्वरूपातील विधान केले आहे. ज्या गरीब सामान्य दलित मुली आहेत त्या नेहमी उसाच्या शेतात पडलेल्या दिसतात मक्याच्या शेतात पडलेल्या का दिसत नाहीत ? अशा प्रकारची विधाने हे लोक करताहेत कारण त्यांना पूर्णपणे खात्री आहे की, त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत म्हणून ते अशा प्रकारचे धाडस करत असल्याची टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
असे विधान हे लोक करत आहेत कारण महिला मतांची यांना गरज नाहीत तसेच जी मुलगी जीवानिशी गेली तिचे जीवन अशा लोकांना कस्पटापेक्षाही कमी किमतीचे वाटते असं देखील यावेळी गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.
अशा व्यक्तींमध्ये सत्तेचा गर्व असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तसेच याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच उत्तरप्रदेशचे पोलीस यांच्याकडे देखील निवेदन दिले असल्याची माहिती देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दिली. मात्र गृहमंत्र्यांना याची जाणीव करून देऊन देखील याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली. मात्र न्यायालयाने अशा व्यक्तींना समंस देऊन त्यांच्या बोलण्यावर अंकुश ठेवावा अशी इच्छा देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
Read Also
किती सहन करायच आम्ही, सरकार आहे की जिवंत लाश? नितेश राणेंचा सवालhttps://t.co/riUJCGm8yc @meNeeleshNRane @NiteshNRane @sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020