मुंबई : सुशांतसिग प्रकरणाच्या चौकशीत मुंबई पोलिसांकडून तपास काढून घेऊन सीबीआय कडे दिला गेला, आता सीबीआयने या प्रकरणात काय दिवे लावले आहेत? त्याचा प्रकाश काही दिसलाच नाही, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सीबीआयला केला आहे. काल आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हि भूमिका मांडली आहे.
सत्ताधारी छत्रपतींनीच आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा
‘मराठा समाज आरक्षणाचे नेतृत्व करणारे दोन्ही छत्रपती हे भाजपचे खासदार आहेत. केंद्रामध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे या सत्ताधारी खासदारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली . कृषी विधेयकांतील काही बाबींना विरोध ‘ नव्याने मांडण्यात आलेली कृषी विधेयके ही शेतकऱ्यांच्या हिताची आहेत,असा प्रचार केला जात आहे. मात्र ते पूर्ण सत्य नाही, यातील अनेक बाबी या शेतकरीहिताच्या नाहीत. यावर काही राज्यांनी भूमिका जाहीर केली आहे . आम्ही यावर चर्चा करीत असून , या विधायकांविरोधात देशव्यापी एकच भूमिका असावी , असे मला वाटते. असे शरद पवार यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे.
Read Also :
बाबरी निकालांनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…https://t.co/pKDyJx5LsZ#BabariCase #Shivsena @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020