राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पराभव झाल्यामुळे दुखावले गेलेले भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे भाजपकडून महाविकासआघाडीवर जोरदार टीका होत आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही.” अशा खोचक शब्दात निलेश राणे यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे.
निलेश राणे यांचे ट्विट –
“३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.”
३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020