मुंबई : एमआयएम नावाच्या घाणीचा आता बंदोबस्त झाला पाहिजे, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई पोलिसांनी बेकायदेशीररित्या बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात एमएआयएम आणि काँग्रेसच्या एका आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून निलेश राणेंनी एमआयएम व ओवैसींवर निशाणा साधला आहे.
तो बिन कवडीचा ओवेसी आणि त्याच्या पक्षाला भारतामध्ये बंदीच घातली पाहिजे. जो ‘भारत माता की जय’ म्हणत नाही अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. MIM नावाच्या घाणीचा बंदोबस्त आत्ताच झाला पाहिजे.
बांगलादेशी घुसखोरांना मदत?https://t.co/cZKWV7cuDu
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 2, 2020
निलेश राणेंनी ट्विट केल की, तो बिन कवडीचा ओवैसी आणि त्याच्या पक्षाला भारतामध्ये बंदीच घातली पाहिजे. जो ‘भारत माता की जय’ म्हणत नाही अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. MIM नावाच्या घाणीचा बंदोबस्त आत्ताच झाला पाहिजे.