मुंबई : राज्यात सध्या वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलामधून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. सर्वच विरोधी पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी राज्या सरकारवर जोरदार टीका केली असून, त्येक गोष्ट लोकांची जबाबदारी असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का? असा सवाल केला आहे.
अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2020
निलेश राणेंनी ट्विट केले की, अगोदर माझं कुटुंब, माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी, ठाकरे सरकार सुधरणार नाही. त्येक गोष्ट लोकांची जबाबदारी असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?
दरम्यान, येत्या तीन दिवसात तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.