मुंबई – मुंबई मेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले आहेत. सध्या या भूखंडावरील काम जैसे थे ठेवावे असे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भिंतीवर थुंकू नका लिहूनही लोक थुंकतात. तसंच काहीसं ठाकरे सरकारचं झाल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. काही भिंतींवर थुंकना मना है, असं लिहिलेलं असतं. तिथेच लोक जास्त थुंकतात. ठाकरे सरकारचंही तेच झालं आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.
काही भिंतींवर "थूकना मना है" लिहिलेले असते..
तिथेच लोक जास्त थुंकतात..
ठाकरे सरकारच तेच झालं आहे!!#MetroCarShed #aarey— nitesh rane (@NiteshNRane) December 16, 2020