कोल्हापुर: कोल्हापुरात गोकुळ जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या दरम्यान चांगलंच राजकारण ढवळून निघाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधी गट आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनी एकमेकांच्या विरोधात जोर लावला आहे. दोन्ही बाजुंनी आता पर्यंत निवडणूक चांगलीच लावून धरलेली आहे. राजकीय दृष्ट्या गोकुळच्या निवडीला मोठे महत्व आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची गोकुळ निवडणूक 70 मतदान केंद्रावर घेतली जाईल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी शर्थीचे पालन करुनच मतदान होईल. सत्तारुढ गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले आहे. विरोधकांनी आता जागतिक न्यायालयात जाऊ नये. आतापर्यंत उच्च न्यायालय झाले. सर्वोच्च न्यायालय झाले, त्यामुळे जागतिक न्यायालयाकडे जाऊ नये असा टोला सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेत लावला आहे. “Now don’t go to the world court to cancel Gokul’s election”; Satej Patil’s Criticized on Mahadik
आता महाडिक गटाने नेटाने निवडणुकीला सामोरे जावे असे ते यावेळी म्हटले आहेत. कसबा बावडा येथे पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सतेज पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब चोगुले हे उपस्थित होते. दरम्यान , जर ठरावदार कोरोना पॉझिटिव्ह असतील, तर शेवटच्या तासात त्यांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले .पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले वर्षभर प्रशासन सर्व नियम अटी पाळून ही निवडणूक घेईल. मतदारांना याचा त्रास होणार नाही. तालुकानिहाय मतदान आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर 50 मतदानच होईल. त्यामुळे सर्व सुरक्षितता पाळली जाणार आहे. सकाळी 8 ते 5 दरम्यान, मतदान होणार आहे . एका मतदान केंद्रावर 100 मतदान घेतले जाणार होते.
परवा राजस्थानमध्ये झालेल्या मतदानामध्ये कोरोना झालेल्या आमदारांनी पीपीई किट घालूनच मतदान केले होते. पश्चिम बंगालचे मतदान झाले. लोकशाहीत निवडणूका स्वीकारल्या आहेत. यातून जो निर्णय आहे, तो स्वीकारला पाहिजे. राज्य सरकारनेही सर्व नियम पाळून निवडणूक घेऊ, असे सांगितले आहे .सर्वोच्च न्यायालयानेही निवडणुकीचे दोनच टप्पे ठेवले आहेत. अशा वेळी निवडणूक थांबवण्यापेक्षा कोरोना संसर्गाचे सर्व नियम शंभर टक्के पाळून निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सहकार प्राधिकरणाच्या आदेशा विरोधात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. गोकुळ दूध उत्पादक संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुकांनाच स्थगितीची मागणी केली आहे होती. “गोकुळ’ च्यावतीने ज्येष्ठ वकिल ऍड. वाय. एस. जहांगीरदार यांनी ही याचिका दाखल केली आहे. “Now don’t go to the world court to cancel Gokul’s election”; Satej Patil’s Criticized on Mahadik