मुंबई : गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात केली होती. कोरोनाला घाबरण्याचं काम नाही पण खबरदारी घ्यायला हवी. जबाबदारी तुमच्या खांद्यावरही टाकणार आहे. काही गोष्टींची खबदारी तुम्ही घ्यायची आहे.असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी सुरू केलेल्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या अभियान सुरू केले आहे. दरम्यान, या अभियानावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत जनतेशी संवाद साधत होते. तसेच ऑनलाईन माध्यमातून वैद्यकीय गोष्टींचा देखील पाठपुरावा करत होते. मात्र अनेकदा विरोधकांनी त्यांना घरून काम करतात म्हणून लक्ष केल्याचे दिसून आले होते.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी, असं म्हणतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
पहिले..
तुम्ही खबरदारी घ्या .. मी जबाबदारी घेतो..काही महिन्या नंतर..
माझे कुटुंब .. माझी जबाबदारी..अजुन काही महिन्या नंतर ..
तुम्ही सगळे मरा.. मी राहतो घरीच!! #SaveMaharashtraFromMVA— nitesh rane (@NiteshNRane) October 6, 2020
Read Also
राज्यात अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार !https://t.co/LsJr7R1Mwp#MahavikasAaghadi @raosahebdanve
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020