मुंबई : ‘संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे,’ असा अप्रत्यक्ष निशाणा मुख्यमंत्री उद्धव यांनी साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. ‘जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?’ असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.
‘भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला, आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्यायहक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. ओबीसी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे “आदळआपट” असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !’ असे प्रवीण दरेकर म्हणाले.
OBC व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे “आदळआपट” असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !
‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही ? @OfficeofUT @CMOMaharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 26, 2021
‘संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही? असा सवालही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असे शिवसेना सांगत आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे,’ अशी खोचक टीकाही प्रवीण दरेकरांनी