मुंबई: महाराष्ट्रात सध्या जागतिक महामारीने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात गेल्या ५ दिवसांपासून ६७००० हजार रुग्ण दर दिवसाला वाढत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर जरी चांगला असला तरी वाढणारी रुग्णसंख्या मात्र कमी होत नाहीये. त्यातच ऑक्सिजन च्या तुटवड्याचे संकट महाराष्ट्रावर आहे. केंद्र सरकारने विशेष विमानानाने महाराष्ट्र सरकारला ऑक्सिजन चा पुरवठा केलेला आहे. त्यातच आता लसीकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी ने मोफत लसीकरण करणार असे म्हटले होते त्यावरून त्यांच्यातच ताळमेळ बसत नाहीये. विरोधी पक्षाने मोफत लसीकरण करावे अशी मागणी लावून धरलेली आहे.
महाविकास सरकार जागतिक महामारीवर मात करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला. कांदिवली येथील भुराभाई आरोग्य भवन आणि नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दरेकर बोलत होते.
महाराष्ट्रात आणि मुंबईत महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहेत. अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपणया महामारीतून मुक्त करूया, असं प्रविण दरेकर म्हणाले. दरम्यान, नागपूरमधये या महामारीची रुग्णसंख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यावर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली असे देखील ते या वेळी म्हटले आहेत.