विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (20 ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला.
सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे हात दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाष्य कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नकोय असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढचं ते बोलतात. शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.
तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले,” मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर कधीही टीका केली नाही, पुलावरून पाहणी केली त्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. दौरा करा अथवा करू नका, पण शेतकऱ्यांना मदत करा असं सांगत राज्याला तात्काळ मदत द्यावी असं विनंती मी अमित शहांना केली आहे. मी बोललो अथवा मुख्यमंत्री बोलले तरी केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार आहे. संकटकाळात पक्षपातीपणा करत नाही”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.
Read also :
विडी उद्योगातील कामगाराकरीता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावेhttps://t.co/kHmkKxPobZ#PranitiShinde #Congress #CMUddhavthackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020