मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता चांगलाच वाढला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भव्य असा रोड शो केला. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही आघाडीचे नेते जाहीर प्रचारसभा घेतांना दिसत आहेत. अशातच पैसा फेको तमाशा देखो हा शिंदेंचा जाहीरनामा असल्याची टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय.
हेही वाचा…“सत्तापिपासू भाजपा मृ’त’दे’हा’वरून रॅली काढतंय काय?” मोदींच्या रॅलीवर कॉंग्रेसचा हल्लाबोल
घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोन घटनाबाह्य पक्ष ते प्रचार करत आहेत. अन् ज्यांनी घटनेचं सरक्षण केलं पाहिजे. ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत आहे. हे आश्चर्य आहे. त्यामुळेच संविधान रक्षणासाठी लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली पाहिजे. यातच घटनाबाह्य सरकारचा किंवा पक्षाचा जाहिरनामा नेमका कशासाठी हवा आहे ? पैसा फेको अन् तमाशा देखो हाच त्यांचा जाहिरनामा आहे. हेलिकॉप्टरमधून फेटी, खोके उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे. लाखो मत विकत घेण्याच्या योजना आणायच्या. रेटून खोटं बोलायचं हा त्यांचा जाहिरनामा आहे. याच्यापलिकडे त्यांचा जाहिरनामा नव्याने निर्माण करण्याची काहीही गरज नाही. अशी टिका देखील त्यांनी केलीय.
ज्यांनी पक्ष चोरलं आहे. त्यांनी आता कबूल केलं आहे. चोर कोण आहेत ? त्यांना मदत कुणी केली ? चोराला पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणुक आयोगाने मदत केली. त्यांचे ते साथीदार आहेत. ते चोरांचे सरदार आहेत. त्यामुळेच आम्हाला संविधानाची रक्षा करायची आहे. शिवसेना पक्ष आम्ही व्यवस्थित रित्या सांभाळलं आहे. त्यामुळे येत्या ०४ जून रोजी सगळ्यांना लक्षात येईल की, शिवसेना कुणाची आहे. राष्ट्रवादी कुणाची आहे ? त्यानंतर भाजप कुठे आहे ? ते पण आपल्याला दिसेल. असेही त्यांनी इशारा दिलाय.
देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोडशो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहे. त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन, रेल्वे कार्यालय सगळं बंद केलं, लोकांचे किती हाल झाले ? त्यावेळी निवडणूक आयोग आहे कुठे होता ? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता. एका व्यक्तीने प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा. म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले. ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला. होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात. यासारख्या माणूस नाही. अशी टिका देखील राऊतांनी मोदींवर केली.
तसेच महाराष्ट्रात आणि देशांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध होत आहे. येत्या चार जूननंतर या देशात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अस्तित्व राहील की नाही, हा आमच्या पुढला मोठा प्रश्न आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं, अशी आमची भूमिका आहे. असा टोलाही राऊतांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“भगरेंसारखा अनमोल हिरा हुडकून दिल्याबद्दल आभार”
हेही वाचा..“राज ठाकरेंचं महाराष्ट्रात स्थान काय ?” शरद पवारांनी दोन वाक्यात विषय संपवला
हेही वाचा…“थोडी तरी कदर बाळगा”, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप, शरद पवार गटाने पटेलांना झापलं
हेही वाचा…कांद्यावर बोला, कांद्यावर बोला, नाशकात मोदींच्या विरोधात भाषणाच्याच वेळी शेतकऱ्यांचा रोष
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा