माजी आमदार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गणेश उत्सवाच्या पार्शवभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधला आहे. लवकरच जनतेच्या भेटीसाठी येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
“माझा मुलगा शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. त्याच्याबरोबर मलाही तेथे जावे लागणार आहे. तेथे गेल्यानंतरही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यासाठी आणखी काही दिवस जातील. मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला मी पुन्हा जनतेच्या भेटीसाठी त्याच झंजावातात येणार आहे असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजाताई म्हणाल्या, की मी ही साध्या पद्धतीनेच गणपतीची स्थापना केली आहे. यावर्षी ढोलताशा आवाज नाही. कोरोनामुळे काही बंधनं आली आहेत. देश आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा अशी मी आज गणरायाकडे प्रार्थना केली आहे. चांगल्या विचाराने केलेले काम कधीही वाया जात नाही. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवली. नात्याची किंमत कळली. कोरोनाचे संकट हे दुर्दैव असले तरी काही गोष्टी संकटातही शिकता आल्या. कोरोनामुळे प्रशासनाने घातलेल्या नियमामुळे थोडी दूरी निर्माण झाली होती पण, तीही दूर होईल. लवकरच जनतेच्या भेटीसाठी मी येणार आहे असेही पंकजाताई म्हणाल्या.