पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलं आहे. मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. आज देशभरात भारत बंद पाळला जात असून, त्याचे पडसादही ठिकठिकाणी दिसून येत आहे.
शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधाचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शेतकरी व कामगार विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्त काळा पोषाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. शिवसेनेने देखील केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शेतकरी विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात देशभरातील शेतक-यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिल्याने देशभरातील बहुतांश राजकीय, सामाजिक, कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी देखील काळ्या फिती लावून कामावर हजर राहत भारत बंदला पाठिंबा घोषीत केला आहे.
Read Also :
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन
मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गौप्यस्फोट