यावेळी महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली . दरम्यान यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ‘जसाजसा काळ जात आहे तसतसे महामारीचे रुपही बदलत आहे आणि बऱ्याच प्रकारच्या परिस्थिती समोर येत आहेत. बिहार, गुजरात आणि तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना टेस्ट वाढवणे गरजेचे आहे.’ तसेच ‘७२ तासांत कोरोना प्रकरणाची ओळख पटली तर जीव वाचू शकले’, असे तज्ज्ञ सांगत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पुढे मोदी म्हणाले, ‘आता या ७२ तासांच्या फॉर्म्युलावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जेव्हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळेल, तेव्हा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ७२ तासांत कोरोना टेस्ट होणे गरजेचे आहे. दिल्ली-उत्तर प्रदेशमध्ये भयभयीत करणारी परिस्थिती होती. परंतु टेस्टिंग वाढवल्यामुळे परिस्थिती सुधारली आहे.’