‘शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. पण या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. किंबहुना हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाही. सरकारकडून फक्त पत्रव्यवहार सुरू आहे’, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.
शासनाची पूर्ण फोर्स वापरून तातडीने पंचनामे पूर्ण करा. तसंच पीक विम्याचे क्लेम तातडीने मंजूर करा, अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या. जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रवीण दरेकर म्हणाले, ‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याचबरोबर बागायती जमिनीसाठी 50 हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार हेक्टरी मदत द्या. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
Read Also :
महात्मा गांधींना अभिवादन करताना मनसेचा शिवसेनेला टोला https://t.co/vL6ZFfNoIj @SandeepDadarMNS @mnsadhikrut @ShivSena @RajThackeray @MNSAmeyaKhopkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020