मुंबई : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आले आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकारच्या फाजील आत्मविश्वासामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा झाला असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.
देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
केंद्र सरकार के प्रेसवार्ता के अनुसार, अक्तुबर २०२० मे भारत मेडिकल ऑक्सीजन आपूर्ती के मामले “extremely comfortable” स्थिती मे था | और केंद्र सरकार १ लाख टन मेडिकल ऑक्सीजन आयात कर रही थी | https://t.co/MI8GCOrG5o https://t.co/IYjiHZcOTI pic.twitter.com/ndpdnTbdKM
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 28, 2021
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, असं सचिवांनी म्हटलं होतं. ऑक्टोबर 2020 मध्येच 1 लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असं देखील त्यांनी सांगितलं होतं. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना ‘भारताने कोरोनाला कसे हरवले’ असे सांगत स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला.