नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केलेली आहे. पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांचे पाचव्या दिवशीदेखील आंदोलन सुरु आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने स्पीक अप इंडिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पाठिांबा देण्यासाठी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नाम किसान कानून
लेकिन सारा फायदा अरबपति मित्रों काकिसान कानून बिना किसानों से बात किए कैसे बन सकते हैं? उनमें किसानों के हितों की अनदेखी कैसे की जा सकती है?
सरकार को किसानों की बात सुननी होगी। आइए मिलकर किसानों के समर्थन में आवाज उठाएं।#SpeakUpForFarmers pic.twitter.com/av8i7jhUpt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 30, 2020
प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कायद्यांचे नाव कृषी कायदे ठेवण्यात आले आहे, पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा अशी टीका, प्रियांका गांधी यांनी केली.