अकोला – एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे राज्यातील नाशिक शहरामधील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शासनाचा हा दुर्लक्षपणा असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
नाशिकमधील घटना मनुष्यवधच आहे. Oxygen पुरावण्यापासून ते टॅंकमध्ये भरण्यापर्यंत सर्व काम काँट्रॅक्टवर देण्यात आले आहे. Oxygen भरताना झालेल्या चुकीमुळे त्याची गरज असणाऱ्या रुग्णांना तो मिळाला नाही आणि त्यांचे प्राण गेले. यात शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. pic.twitter.com/JBXiZkbmaU
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 21, 2021
याबाबत ट्विट करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील घटना मनुष्यवधच आहे. Oxygen पुरावण्यापासून ते टॅंकमध्ये भरण्यापर्यंत सर्व काम काँट्रॅक्टवर देण्यात आले आहे. Oxygen भरताना झालेल्या चुकीमुळे त्याची गरज असणाऱ्या रुग्णांना तो मिळाला नाही आणि त्यांचे प्राण गेले. यात शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यात जबाबदार काँट्रॅक्टरवर कारवाई होईल अशी अपेक्षा करतो It expects action to be taken against the responsible contractor. या घटनेत बळी पडलेल्या सर्वांना पक्षातर्फे, माझ्या व माझ्या कुटुंबातर्फे भावपूर्ण आदरांजली.
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.