शिर्डी : केंद्र सरकारने लागू केलेल्या कांद्याच्या निर्यातबंदीवर राधाकृष्ण विखे पाटलांनी भाष्य केले आहे. साठेबाजीला अटकाव करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून निर्यात बंदीचे आम्हीही समर्थन करत नाही. निर्यातबंदीचा आणि नवीन कृषी धोरणाचा कोणताही संबंध नाही. मात्र काँग्रेससह विरोधक संभ्रम पसरवत असून शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
राज्यातील भाजपा नेत्यांनीही कांदा निर्यातबंदी उठवावी, ही मागणी केलेली आहे. विरोधकांना नवीन कायद्यावर चर्चाच करायची नव्हती. आपल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल, विरोधकांना भीती असल्यानं काँग्रेससह विरोधकांना शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करायच आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
नवीन कृषी धोरण शेतकरी हिताचे असून नवी कृषी कायदा जरी आला तरी हमीभाव मिळणारच आहे. आजपर्यंत संगनमत करून शेतकरी लूटला जात होता. अनेक बाजार समित्याही या लूटीत सहभागी आहेत. नवीन कायद्यानुसार लुटीला चाप बसणार असल्यानं विनाकारण संभ्रम पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधी पक्ष स्वतः च संभ्रमात असून केवळ राजकारण करत आहे, अशा शब्दांत य अशी टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. दरम्यान, केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे.
Read Also :
https://twitter.com/PoliticalMH/status/1309109046595723264?s=20