नवीन कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्याच्या भारत बंदला काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थ दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.
राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नाही, असे म्हणत राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी गांधी कुटुंबावर हल्ला चढवला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आठ तारखेला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत पूनिया यांनी अशोक गेहलोत यांच्यावर देखील निशाणा साधला. राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तरही अशोक गेहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिज, असेही ते म्हणाले.