काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बेरोजगारीबाबत सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. गेल्या 4 महिन्यांत 2 कोटी लोकांच्या हातून नोकर्या गेल्या आहेत. तसेच अर्थव्यवस्थेचा सत्यानाश झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांत दोन कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या. दोन कोटी कुटुंबांचे भविष्य अंधारात गेले आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि विद्वेश पसरवून आता अर्थव्यवस्थेचा सत्यानाश झाला आहे. हे सत्य तुम्ही देशापासून लपवू शकत नाही.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली आहे. आता सत्य जग जाहीर आहे. एप्रिल-जुलै 2020 मध्ये 1.90 कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. एकट्या जुलै महिन्यात 50 लाख लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. शेती आणि बांधकाम क्षेत्रात 41 लाख लोकांच्या नोकर्या गेल्या असून भाजपने लोकांच्या पोटा पाण्यावर ग्रहण लावले आहे अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.