औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष हा मोठ्या प्रमाणात वाढला, असा पुन्हा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत काढला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच त्यांनी प्रबोधन ठाकरे यांचे संदर्भ देखील दिले. त्यावेळी राज ठाकरे यांना काही पुस्तकाच्या ओळी देखील वाचून दाखवल्या.
लोकांच्या माथी भडकवण्यासाठी जेम्स लेनसारखा माणूस उभा केला. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज देशात घराघरात पोचवले त्यांना पवारांनी उतरत्या वयात त्रास द्यायला सुरू केला. माझं पवारांना सांगण आहे, आम्हाला जातीपातीबद्दल भेदभाव शिकवला नाही, छत्रपती महाराजांची रायगडावरील समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना आता ब्राम्हण म्हणून बोलणार का त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं त्यांचं नावही मराठा ठेवला होतं.
रामदास स्वामींनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे लिहलंय, त्यापेक्षा उत्तम लेखन मी बघितलं नाही, त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी ते लिखाण वाचून दाखवलं. पवारांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तर आहे. परंतु सर्वात आधी शिवाजी महाराजांचा आहे. आता मी बोलायला लागल्यावर पवार बोलायला लागेल. आधी फोटो पण महाराजांचा नसायचा आता लागल्यावर पवार बोलायला लागेल. तुमचे आमदार निवडून यावे म्हणून तुम्ही जातीय विष पसरवलं अशी टिका देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर केला.
अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर अत्याचार केला. तेव्हा एकनाथ महाराजांनी दार उघड बये दार उघड अशी हाक दिली आणि 1630 ला दार उघडलं आणि छत्रपतींचा जन्म झाला. नरहरी कुरुंदर यांच्या पुस्तकात त्यांचं छान वर्णन केलं आहे. महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेब इथं आला आणि तो पुन्हा तो कधी गेलाच नाही. औरंगाजेबाने पाठवलेल्या पत्रात शिवाजी अजून मला छळतोय असा उल्लेख केला असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
प्रत्येक गोष्ट जातीतून बघायची ही राष्ट्रवादी काॅंग्रेसची पद्धत आहे. त्यांच्या एकही सभेत छत्रपती शिवाजी महारांजाचा उल्लेख आला नाही. आता मी बोलायला लागल्यावर खोटे व्हिडीओ काढालायला लागले आहेत. मी नास्तिक बोललेलं पवारांना झोंबलं अन् मग देवाची पुजा करतानाचे फोटो त्यांनी काढले. माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.