मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली घटना पाशवी, पण अशी घटना महाराष्ट्रात घडली असती तर स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/qfPZtOlIBH
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
याबाबत राज ठाकरे म्हणाले की, हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
त्याचसोबतच महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गेल्या महिनाभरापासून सुरु महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या चॅनेलचा समाचार घेतला.
ही तर लोकशाहीची गळचेपी ; राहुल गांधींना धक्काबुक्की प्रकणावरून काँग्रेसची टीकाhttps://t.co/t0y4tgRWYc#JusticeForManishaValmiki
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020