पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडीग सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांना केला आहे. त्यावर महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा आहे, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचंही ते म्हणाले. भोंग्याचा विषय काढल्यानंतर सकाळच्या अजान बंद झाल्यात जवळपास 28 हजार मनसैनिकांना भोंग्यासंदर्भात नोटीस गेल्या असल्याचही माहिती त्यांनी दिली.
संदीप देशपांडे यांना जसं काय पाकिस्तान बॉर्डर करून आल्यसाऱखं त्यांना शोधत होते. तसेच संदीप देशपांडे यांच्या बायकोने फ्रिज उघडून दाखवला. त्यात नाही आहे, असाही टोला त्यांना लगावला. परंतु यामध्ये किशोर शिंदे आपल्या वकिलांच्या टीमने दाखवलेल्या कर्तव्यामुळे ही सगळी पोरं बाहेर निघाली. आंदोलने होतील. काळजी नसावी, टीम तयार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दीड-दोन महिन्यानंतर मी पुन्हा समोर येणार आणि पुढची सभा होईल, असंही ते म्हणाले.
रेल्वे भरतीसाठी काही उत्तर भारतीय तरूण महाराष्ट्रात आली होती. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मनसैनिक गेले असता त्या पोरांनी मनसैनिकांना शिवी दिली. त्यापासून हे प्रकरण सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील, तसेच महाराष्ट्रातील तरूणांना नोकरी मिळायला हवी. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी स्थानिक भाषेत रेल्वे भरती घेण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील अनेक तरूणांना नोकऱ्या मिळाल्या. असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडताना ते म्हणाले की, तुमच्या अंगावर आंदोलन करतानाची एक तरी केस आहे का? तसेच संभाजीनगरच्या नामंतरावरून देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं. ते म्हणाले की, संभाजी नगरचं नामंतर झालं, मी बोलतोय ना, त्या दिवशी मुख्यमंत्री बोललो. मात्र तु कोण आहे ? असा प्रतिप्रश्न राज ठाकरेंनी केला. केंद्रात सत्ता असताना संभाजी नगरचा प्रश्न मिटवला नाही. निवडणुका पुरता तो विषय जिवंत ठेेवायचा आणि त्यावर मत मागायची असंही ते म्हणाले.