पुणे : रेल्वे भरतीसाठी काही उत्तर भारतीय तरूण महाराष्ट्रात आली होती. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मनसैनिक गेले असता त्या पोरांनी मनसैनिकांना शिवी दिली. त्यापासून हे प्रकरण सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील, तसेच महाराष्ट्रातील तरूणांना नोकरी मिळायला हवी. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी स्थानिक भाषेत रेल्वे भरती घेण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील अनेक तरूणांना नोकऱ्या मिळाल्या. असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडताना ते म्हणाले की, तुमच्या अंगावर आंदोलन करतानाची एक तरी केस आहे का? तसेच संभाजीनगरच्या नामंतरावरून देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं. ते म्हणाले की, संभाजी नगरचं नामंतर झालं, मी बोलतोय ना, त्या दिवशी मुख्यमंत्री बोललो. मात्र तु कोण आहे ? असा प्रतिप्रश्न राज ठाकरेंनी केला. केंद्रात सत्ता असताना संभाजी नगरचा प्रश्न मिटवला नाही. निवडणुका पुरता तो विषय जिवंत ठेेवायचा आणि त्यावर मत मागायची असंही ते म्हणाले.
शिवसेनेचा एक खासदार त्याठिकाणी पडला आणि त्याठिकाणी एमआयएमचा खासदार निवडणुन आला. त्यासाठी यांनीच त्यांना भुसभुसीत जागा दिली. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं.? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? असा सवाल देखील त्यांनी केला. अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झाला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली अजानचा आवाज हळुहळु वाढणार. भोंग्याचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. असंही ते म्हणाले.