सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेवरुन राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला “आत्महत्या करणारा कोण आहे, हे बघून चर्चा होणार असेल, तर आपण कुठे निघालो आहोत”, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं
“लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या? आज वीज बिल जास्त आलं, म्हणून ग्राहकाने आत्महत्या केली. यावर आपण चर्चा करणार आहोत, की नाही”, असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
“सुशांतच्या आत्महत्येवर जितकी चर्चा होते, तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली, तर किमान प्रश्न सुटतील”, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं.