वाढीव वीज बिलावरून माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले असून वीज बिला बाबत सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कोल्हापूरमध्ये आज वीज बिलांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . यावेळी बोलताना ते म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला रोजगार नाही. या काळात ग्राहकांनी जास्त वीज वापरली का नाही? याची खातरजमा न करता, त्यांना वाढीव वीज बिल पाठवले आहे. ही वीज बिल सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून सरकारविरोधात उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केले होते. मात्र आता वाढीव वीजबिलावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आवाज उठवत इशारा दिला आहे.