जळगाव : मागील अनेक दिवसांपासून नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आज शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये झालेली बैठक देखील निष्फळ ठरली आहे. यातच आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनी कृषी कायदा शेतकऱ्यांच्याच हिताचे असल्याचे म्हटले आहे.
कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. शेतकऱ्यांचे नुकसान न होणारे हे बिल आहे, असे म्हणत त्यांनी रक्षा खडसे यांनी समर्थन केले. सोबतच शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, शेतकऱ्यांसोबत आज झालेली केंद्र सरकारच्या बैठकीत काहीही तोडगा निघालेला नाही. आता पुढची बैठक 9 डिसेंबरला होणार आहे. कृषी कायदे मागे घ्यावे अन्यथा 8 डिसेंबरला शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे.