महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महाविकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी एक पोस्ट टाकत आपल्या आमदारकीचा एक वर्षाचा अनुभव शेअर केला आहे.
मात्र रोहित पवार यांच्या या पोस्टवर भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
`बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राम शिंदे यांनी केली. “मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना ते पुन्हा भूमिपूजन करत आहेत. तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली,” अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला. “बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे,”असंही ते म्हणाले.