नाशिक – मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले आहेत,” असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. “आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण द्यावं. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले.
“आरक्षण देण्याचं आमच्या मंत्रालयाच्या हातात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे वेगळी कॅटेगरी करुन द्यावं, ओबीसी मधून नाही,” असेही रामदास आठवले म्हणाले.
“माझं मंत्रालय अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच भटक्या विमुक्तांना सवलती देण्यासंदर्भात आमचा विचार सुरु आहे. त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाऊंटवर स्कॉलरशिप देऊ,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले.