मुंबई : शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 8व्या स्मृतीदिनानिमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिंपाई (अ)चे प्रमुख रामदास आठवले यांनी त्यांना अभिवादन केले आहे. रामदास आठवलेंनी या निमित्ताने ट्विट आपल्या मनातील भावना देखील बोलून दाखवली आहे.
शिवशक्ती, भीमशक्ती आणि भाजप या तिन्ही पक्षांनी भविष्यात एकत्र यावे हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल, असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याबद्दल देखील त्यांनी खंत व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्तीभीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली पण नंतरच्या काळात ती तुटली त्याची खंत वाटते.भविष्यात पुन्हा ती एकजूट उभारावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!@CMOMaharashtra
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 17, 2020
रामदास आठवलेंनी ट्विट केले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली. पण, नंतरच्या काळात ती तुटली त्याची खंत वाटते.भविष्यात पुन्हा ती एकजूट उभारावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!