श्रीहरी बागल यांचा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात चार दिवस दौरा
प्रतिनिधी: विवेक पानमंद
पंढरपूर: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे राजकारण देखील चांगलेच जोर धरत आहे. स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निधनानंतरर आता पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवणुकीदरम्यान राजकारण चांगलेच तापले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दोन बंडखोर अपक्ष यांच्यात मुख्य लढत होणार आहे. महाविकास आघाडी तर्फे स्वर्गीय भारत भालके भगिरथ भालके हे मैदानात उतरले आहेत तर भारतीय जनता पक्ष तर्फे समाधान अवताडे हे लढणार आहेत. त्यातच आता महाविकास आघाडी करता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाविकास आघाडीचा घटक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष- अॅड. श्रीहरी बागल साहेब यानी पंढरपुर मंगलवेढा मतदारसंघात सतत चार दिवस दौरा करून अनेकांच्या भेटीघाटी घेतल्या व राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके याच्या प्रचारात सक्रिय सहभागी होऊन भरघोस मतानी विजयी करण्यासाठी कामा लागा असे आदेश यावेळेस दिले आहेत. तसेच लेखी जाहिर पाठिंब्याचे पत्र हि भगीरथ भालके याना प्रत्यक्ष भेटुन अॅड. श्रीहरी बागल यांनी दिले आहे.
राष्ट्रीय स्वराज्य सेना महाविकास आघाडीचा घटक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात सतत चार दिवस दौरा केला. घटकपक्ष सोबत असल्याने आणि घटकपक्षाने आपली सर्व ताकद पणाला लावल्यामुळे आता महाविकास आघाडीचे पारडे जड होणार आहे. श्रीहरी बागल यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत खरी रंगत आली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी नवा उमदा तरुण चेहरा म्हणजेच भागीरथ भारत भालके आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे जनतेला त्यांनी आवाहन केले आहे.