भाजप खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार सप्टेंबरपर्यंत पडण्याचे भाकित वर्तवल्यानंतर त्यांना शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी राणोंवर प्रहार केला आहे. तिन्ही पक्ष एकमताने काम करत असल्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राणेंचे भाकीत खोडून काढले.
तिन्ही पक्षात एकमत नसल्याने महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर नंतर टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडणार असे वक्तव्य काल नारायण राणे यांनी केले होते.
राणेंच्या या वक्तव्यावर , ”सध्या काही जणांना काहीच कामधंदा उरलेला नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहे, असा टोला शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंवर लगावला आहे.
शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तिन्ही पक्ष मिळून राज्यात चांगले काम करत आहेत. तिन्ही पक्ष एकमताने काम करत असल्याने हे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंना दिले आहे.